पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

बालदिन

 पंडित जवाहरलाल नेहरू❒*  

    
         भारताचे १ ले पंतप्रधान
               ◆ कार्यकाळ ◆
(१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४)

🔹जन्म  :~ १४ नोव्हेंबर १८८९
     अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
🔸मृत्यू  :~ २७ मे १९६४
           नवी दिल्ली, भारत
🔹पत्नी  :~ कमला नेहरू
🔸अपत्ये  :~ इंदिरा गांधी
🔹व्यवसाय :~  बॅरिस्टर

                     ♦ जवाहरलाल नेहरू
      हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.

                  ● राजकीय आयुष्य ●
   🔷जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

    🔶१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.

   🔷 सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.

  🔶१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.



बाल दिवस १४ नोव्हेंबर - संपूर्ण माहिती

बाल दिवस 14 नोव्हेंबर 2017

मुलांचे हक्क, काळजी आणि शिक्षण याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन दरवर्षी साजरा केला जातो.मुले देशाच्या यश आणि विकासाची गुरुकिल्ली आहे कारण ते आपल्या देशाला नवीन आणि तांत्रिकदृष्ट्या नेतृत्व करतील. ते मौल्यवान मोत्यांप्रमाणे चमकदार आणि आकर्षक आहेत.पालकांना इशावाराद्वारे दिलेली भेटवस्तू आहेत . मुले ही निर्दोष, प्रशंसनीय, शुद्ध आणि प्रेमळ असतात.14 नोव्हेंबर (पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वाढदिवस) संपूर्ण भारताला बालदिन म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्म 14 नोव्हेंबर रोजी झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच ते पंतप्रधान बनले. दर वर्षी बालदिन साजरा केला जातो, कारण पालकामध्ये या दिवसाची जाणीव राहावी.



➤ बालक  दिवस का साजरा केला जातो ?

बाल दिवस हा पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तीच्या जन्म दिवसाच्या रुपात साजरा केला जातो.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी तरुणांच्या कल्याणाकरिता अतिशय उत्तम काम केले.त्यांनी भारतातील मुलांचे शिक्षण, प्रगती आणि कल्याणासाठी भरपूर काम केले.ते मुलांबद्दल खूप प्रेमळ होते आणि त्यांच्यातच चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध झाले.भारतातील तरुणांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी भारतीय शैक्षणिक संस्था इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना केली होती.त्यांनी पंच व वार्षिक योजना तयार केली ज्यात भारतात कुपोषणापासून संरक्षण करण्यासाठी मोफत प्राथमिक शिक्षण, शाळेत मुलांसाठी दूध, मोफत अन्न यांचा समावेश होता. बालकाचा चाचा नेहरूंसाठी प्रेम आणि आवड बघता त्यांचा जन्मदिन म्हणून बालक दिन म्हणून साजरा केला जातो.भविष्यकाळात राष्ट्राची संपत्ती म्हणून यशस्वी होण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनात बालपण हा एक महत्वाचा क्षण आहे, बालपण योग्य मार्गावर जाण्याची आवश्यकता असते. अयोग्य दिशेने चांगले आयुष्य गमावू शकतो. हे केवळ शिक्षण, काळजी आणि प्रगतीसाठी योग्य मार्ग देऊनच करता येते.

➤पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल थोडे

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे महान नेते होते आणि 1 9 47 मध्ये भारत स्वतंत्रतेनंतर तत्कालीन पंतप्रधान म्हणून भारताचे नेतृत्व करत होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 188 9 रोजी झाला, प्रसिद्ध वकील मोतीलाल नेहरू आणि अलाहाबादच्या रक्षा राणीचा जन्म झाला. अतिशय प्रतिभाशाली असल्याने, त्यांचे नाव जवाहरलाल ठेवण्यात आले होते.त्यांनी नंतरचे शिक्षण इंग्लंड येथून केले आणि भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीयांना मदत करायला सुरुवात केली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले. ते एक महान कवी होते. त्यांच्या काही प्रसिद्ध लेखांमध्ये 'विश्व इतिहासची झलक', 'भारतीय शोध' इत्यादी आहेत.गुलाबांची फुले त्यांना मुलांप्रमाणे आवडते असे,ते म्हणतात की मुले उद्यानचे कोठार आहेत. ते असेही म्हणत असत की मुले भविष्यात विकसित होणाऱ्या समाजाची निर्मिती करतील कारण ती देशातील मूळ ताकद असतात. 
बाल दिवस कसा साजरा करावा -


  • मुलांना भेटी आणि चॉकोलेट वितरित करा
  • विविध स्पर्धा जसे की: फॅन्सी ड्रेस, वादविवाद, स्वातंत्र्यसैनिक, देश, कथा आणि प्रश्नोत्तर स्पर्धांसंबंधीचे भाषण.
  • मनोरंजन, गायन, नृत्य आणि इतर संगीत वादन यांसारख्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाद्वारे आयोजित केले जाते.
  • अनाथ मुलांना संगीत वाद्ययंत्र, स्टेशनरी, पुस्तके, कपडे आणि खेळणी वितरीत करून मनोरंजन करता येते.
  • स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित काही कार्यक्रमांचे आयोजन करू शकता.
  • कोडी, मिष्टान्न आणि चीनी खजिना शोधा शोध इत्यादि काही क्रिडा उपक्रमांचे आयोजन करू शकता.
  • प्रतिकूल परिस्थितीतील मुलांनासाठी सुप्रसिद्ध संगीतकार,आरोग्यविषयक कार्यक्रम आणि आरोग्य, संगोपन आणि मुलांच्या प्रगती  भाषण आयोजित केले जाऊ शकतात. 
  •     

    पंडीत जवाहरलाल नेहरू

    *🌸पंडीत जवाहरलाल नेहरू🌸*

     हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.

    *🌸वैयक्तिक आयुष्य🌸*

    श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्‍नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.

    *🌸राजकीय आयुष्य🌸*

    जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

    १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
    सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.

    १९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

    *🔹नेहरूंनी लिहिलेली🔹*

    आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - ना.ग. गोरे)
    इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)

    भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - साने गुरुजी)

    *🔹नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके🔹*

    अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे)

    आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील)

    आपले नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - साने गुरुजी)

    गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी)

    जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)

    नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)

    नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - करुणा गोखले)
    नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)

    पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे)
    पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - राजा मंगळवेढेकर)

    पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार)

No comments :

Post a Comment